१ ऑगस्ट – जयंती विशेष
मराठी साहित्यविश्वात आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत लोकशाहीर अण्णाष भाऊ साठे यांचे नाव अजरामर आहे. गरिबी, उपेक्षा आणि सामाजिक विषमता यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या अण्णा भाऊंनी आपल्या लेखणीतून सामान्य माणसाच्या वेदना, स्वाभिमान आणि संघर्षाला शब्द दिले.
त्यांनी कथा, कादंबरी, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजजागृती केली. “फकिरा” ही त्यांची गाजलेली कादंबरी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या माणसाच्या जिद्दीचे प्रतीक आहे.
त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू हा नेहमीच कष्टकरी, शेतमजूर, कामगार आणि वंचित समाज राहिला.
अण्णा भाऊ साठे यांचा ठाम विश्वास होता की, साहित्य हे केवळ मनोरंजनासाठी नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. त्यांच्या प्रत्येक लेखनातून समानता, बंधुता, न्याय आणि मानवतेचा संदेश उमटतो. त्यांनी आपल्या कलेद्वारे सामाजिक विषमतेला प्रश्न विचारले आणि नव्या विचारांची दिशा दाखवली.
आजच्या पिढीने अण्णा भाऊ साठे यांचे विचार आणि साहित्य समजून घेणे ही काळाची गरज आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, हा संदेश त्यांच्या कार्यातून आजही तितकाच प्रेरणादायी आहे.
१ ऑगस्ट, त्यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भगवा प्रांत न्यूज नेटवर्कतर्फे विनम्र अभिवादन. त्यांचे विचार आणि साहित्य समाजाला सतत प्रेरणा देत राहो, हीच खरी आदरांजली.