होम सोलापूर महाराष्ट्र राजकीय देश - विदेश क्राईम मनोरंजन
---Advertisement---

विडी कामगारांचा रोजगार आणि सोलापूरच्या विडी उद्योगाचे भवितव्य महत्त्वाचे !

On: August 27, 2026 7:21 AM
Follow Us:
---Advertisement---

 

📍 सोलापूर

 

आज सोलापूरमधील विडी कामगार भगिनी तसेच विडी कारखानदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन मजुरी दराबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. सध्या दर हजार विड्यांसाठी ₹२४५ मजुरी दिली जात आहे. शासनाने हा दर ₹३७९ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कामगार संघटना आणि कारखानदारांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

 

मात्र, प्रत्यक्ष कामगार भगिनींशी संवाद साधल्यानंतर एक महत्त्वाची बाब समोर आली. कामगारांना मजुरीपेक्षा त्यांचा रोजगार आणि कारखाने सुरू राहणे अधिक महत्त्वाचे वाटत आहे. कारखाने बंद पडले किंवा इतरत्र गेले, तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर होईल, अशी त्यांची भूमिका आहे. दुसरीकडे, कारखानदारांनीही वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे ₹३७९ मजुरी देणे सध्या शक्य नसल्याचे सांगितले. इतर राज्यांतील विड्यांशी स्पर्धा करताना उत्पादन खर्च वाढल्यास उद्योग अडचणीत येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

म्हणूनच हा विषय केवळ मजुरी वाढीचा नाही; तर हजारो कामगारांचा रोजगार, त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह आणि सोलापूरच्या विडी उद्योगाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. कामगार संघटनेची भूमिका कामगारांच्या हिताची आहे, याचा आदर आहे; मात्र प्रत्यक्ष कामगार आणि कारखानदारांच्या भूमिकाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या सर्व बाजूंचा विचार करून कामगारांचा रोजगार सुरक्षित राहील आणि उद्योगही टिकून राहील, असा व्यवहार्य मार्ग काढणे गरजेचे आहे.

 

या संदर्भात विडी कामगार प्रतिनिधी आणि कारखानदारांशी पुढील चर्चा करून मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस तसेच संबंधित मंत्री महोदयांची भेट घेऊन सोलापूरमधील प्रत्यक्ष परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. रोजगार टिकवणे, कारखाने सुरू ठेवणे आणि सोलापूरच्या विडी उद्योगाचे भवितव्य सुरक्षित करणे, यासाठी योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.

 

#विडी_कामगार #Solapur #विडी_उद्योग #कामगार_हित #BJP4Maharashtra

Dange

लोकसम्राट न्यूज पोर्टल : जनतेच्या आवाजातून उभे राहिलेले लोकशाहीचे व्यासपीठ ‘लोकसम्राट’ न्यूज पोर्टल हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आणि समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्तेच्या केंद्रापासून सामान्य नागरिकाच्या दारापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारिता करते. याच विचारातून ‘लोकसम्राट’ या न्यूज पोर्टलची वाटचाल आकार घेत आहे. संघर्ष, विचार आणि सत्याची वाटचाल ‘लोकसम्राट’ची ओळख केवळ नावापुरती मर्यादित नाही. या नावामागे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, सत्याचा शोध, अन्यायाविरोधात आवाज आणि लोकहिताची भूमिका हा विचार आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासनातील त्रुटी असोत किंवा ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न असोत—प्रत्येक विषयाकडे लोकांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न ‘लोकसम्राट’ करतो. ‘लोकसम्राट’ नावामागची भूमिका ‘लोकसम्राट’ म्हणजे सत्तेचा सम्राट नव्हे; लोकांच्या विश्वासाचा प्रतिनिधी अशी या नावामागची भूमिका आहे. ज्यांचा आवाज अनेकदा मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचत नाही, त्या सामान्य नागरिकांना व्यासपीठ मिळावे, ही या माध्यमाची भूमिका आहे. त्यामुळे ‘लोकसम्राट’च्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. बातमीपेक्षा जबाबदारी महत्त्वाची आजच्या वेगवान डिजिटल युगात बातमी सर्वप्रथम देण्याची स्पर्धा मोठी आहे. मात्र ‘लोकसम्राट’साठी केवळ वेग महत्त्वाचा नसून बातमीची विश्वासार्हता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. एखाद्या बातमीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असेल, प्रशासनाचे लक्ष एखाद्या समस्येकडे वेधले जात असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीचा आवाज संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचत असेल, तर तीच पत्रकारितेची खरी ताकद आहे. जनतेचा आवाज, जनहिताचा विचार ‘लोकसम्राट’ची वाटचाल ही जनतेशी जोडलेली आहे. लोकांच्या समस्या मांडणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे, चांगल्या कामाची दखल घेणे आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, हा या माध्यमाचा मूलभूत उद्देश आहे. सत्य, विश्वास आणि जनहित या मूल्यांच्या आधारावर पत्रकारितेची नवी ओळख निर्माण करण्याचा ‘लोकसम्राट’चा प्रयत्न आहे. पुढील वाटचालीचे ध्येय भविष्यात डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचणे, स्थानिक प्रश्नांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळवून देणे आणि तरुण पिढीला जबाबदार पत्रकारितेशी जोडणे, हे ‘लोकसम्राट’चे ध्येय आहे. लोकसम्राटची खरी ताकद त्याच्या नावात नाही, तर लोकांच्या विश्वासात आहे. आजची छोटी सुरुवात उद्याच्या मोठ्या लोकचळवळीचे रूप घेऊ शकते. सत्यासाठी उभे राहणारी लेखणी, जनतेच्या प्रश्नांसाठी धावणारे माध्यम आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारी पत्रकारिता—हीच ‘लोकसम्राट न्यूज पोर्टल’ची खरी ओळख आणि चरित्रात्मक वाटचाल आहे. लोकसम्राट “लोकांचा आवाज… लोकांच्या प्रश्नांसाठी… लोकहिताच्या वाटेवर!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

गणेश विसर्जन घाटांच्या दुरवस्थेवर नाराजी; मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य वंतिने पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश दादा चिवटे यांना उमेदवारीला पाठिंबा…

मिरवणुकांच्या आवाजावरून पुन्हा प्रश्नचिन्ह; ‘तुमची घरे अडचणीत, आवाजाचा त्रास आधी मान्यतेय?’

मुख्य हेडलाईन “हातात पदवी, पण नोकरीचा पत्ता नाही! शिक्षण आणि रोजगारातील वाढती दरी तरुणांसाठी धोक्याची घंटा” उपशीर्षक “उद्योगांना हवीत कौशल्ये, विद्यार्थ्यांकडे आहेत पदव्या; रोजगारक्षम शिक्षणाची आता नितांत गरज”….

शिक्षक भरतीतील कागदपत्र पडताळणीला गैरहजर राहिल्यास नोकरी गमावण्याचा इशारा; ३४९ उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जाणार…

सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांच्या बेडवर ढेकूणांचा उपद्रव; रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…

Leave a Comment