होम सोलापूर महाराष्ट्र राजकीय देश - विदेश क्राईम मनोरंजन
---Advertisement---

दहा मतदारसंघांमध्ये आमदारांच्या ‘लीड’पेक्षा एसआयआरमधील अपात्र मतदार अधिक…

On: August 24, 2026 4:45 AM
Follow Us:
---Advertisement---

 

लोकसम्राट न्यूज नेटवर्क | सोलापूर

 

सोलापूर जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SIR) मोहिमेत मोठ्या प्रमाणावर अपात्र मतदार आढळून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये संबंधित आमदारांना मागील निवडणुकीत मिळालेल्या विजयाच्या फरकापेक्षा एसआयआर प्रक्रियेत आढळलेले अपात्र मतदार अधिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष पुनरिक्षण मोहिमेनंतर जिल्ह्यातील सुमारे ३९ लाख ४७ हजार ५७ मतदारांच्या यादीतून तब्बल ६ लाख १६ हजार ८८० मतदार अपात्र ठरल्याचे निष्पन्न झाले आहे. या मतदारांमध्ये स्थलांतरित, मृत, दुबार नोंद असलेले अथवा इतर कारणांमुळे पात्रता नसलेले मतदार असल्याचे सांगितले जात आहे.

 

या प्रक्रियेनंतर अनेक मतदारसंघांमध्ये अपात्र मतदारांची संख्या ही संबंधित आमदारांच्या विजयाच्या फरकापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदार यादीतील त्रुटी आणि त्याचा निवडणुकीच्या निकालांवर होणारा परिणाम याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

 

काँग्रेसने या प्रक्रियेबाबत गंभीर आक्षेप नोंदवले असून, एसआयआरचे काम पूर्णपणे पारदर्शक झाले नसल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे पदाधिकारी चैतन्य नरोटे यांनी अनेक बुथस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदारांची प्रत्यक्ष भेट न घेता अहवाल सादर केल्याचा दावा केला आहे. तसेच काही ठिकाणी नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

 

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली असून ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर मतदारांना नावाबाबत दावा किंवा हरकती नोंदविण्याची संधी दिली जाणार आहे. दावा-हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत राहणार असून, त्यावरील सुनावणी आणि अंतिम निर्णयाची प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार आहे.

 

राजकीय विश्लेषकांच्या मते, मतदार यादीतील एवढ्या मोठ्या प्रमाणातील बदलांचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो. विशेषतः ज्या मतदारसंघांमध्ये विजयाचा फरक कमी होता, तेथे अपात्र मतदारांची संख्या अधिक असल्याने निकालांच्या विश्वासार्हतेबाबत चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

 

आता सर्वांचे लक्ष ३१ ऑगस्टला प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीकडे लागले असून, दावा-हरकतीनंतर अंतिम यादीत किती बदल होतात यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत.

Dange

लोकसम्राट न्यूज पोर्टल : जनतेच्या आवाजातून उभे राहिलेले लोकशाहीचे व्यासपीठ ‘लोकसम्राट’ न्यूज पोर्टल हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आणि समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्तेच्या केंद्रापासून सामान्य नागरिकाच्या दारापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारिता करते. याच विचारातून ‘लोकसम्राट’ या न्यूज पोर्टलची वाटचाल आकार घेत आहे. संघर्ष, विचार आणि सत्याची वाटचाल ‘लोकसम्राट’ची ओळख केवळ नावापुरती मर्यादित नाही. या नावामागे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, सत्याचा शोध, अन्यायाविरोधात आवाज आणि लोकहिताची भूमिका हा विचार आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासनातील त्रुटी असोत किंवा ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न असोत—प्रत्येक विषयाकडे लोकांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न ‘लोकसम्राट’ करतो. ‘लोकसम्राट’ नावामागची भूमिका ‘लोकसम्राट’ म्हणजे सत्तेचा सम्राट नव्हे; लोकांच्या विश्वासाचा प्रतिनिधी अशी या नावामागची भूमिका आहे. ज्यांचा आवाज अनेकदा मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचत नाही, त्या सामान्य नागरिकांना व्यासपीठ मिळावे, ही या माध्यमाची भूमिका आहे. त्यामुळे ‘लोकसम्राट’च्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. बातमीपेक्षा जबाबदारी महत्त्वाची आजच्या वेगवान डिजिटल युगात बातमी सर्वप्रथम देण्याची स्पर्धा मोठी आहे. मात्र ‘लोकसम्राट’साठी केवळ वेग महत्त्वाचा नसून बातमीची विश्वासार्हता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. एखाद्या बातमीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असेल, प्रशासनाचे लक्ष एखाद्या समस्येकडे वेधले जात असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीचा आवाज संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचत असेल, तर तीच पत्रकारितेची खरी ताकद आहे. जनतेचा आवाज, जनहिताचा विचार ‘लोकसम्राट’ची वाटचाल ही जनतेशी जोडलेली आहे. लोकांच्या समस्या मांडणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे, चांगल्या कामाची दखल घेणे आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, हा या माध्यमाचा मूलभूत उद्देश आहे. सत्य, विश्वास आणि जनहित या मूल्यांच्या आधारावर पत्रकारितेची नवी ओळख निर्माण करण्याचा ‘लोकसम्राट’चा प्रयत्न आहे. पुढील वाटचालीचे ध्येय भविष्यात डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचणे, स्थानिक प्रश्नांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळवून देणे आणि तरुण पिढीला जबाबदार पत्रकारितेशी जोडणे, हे ‘लोकसम्राट’चे ध्येय आहे. लोकसम्राटची खरी ताकद त्याच्या नावात नाही, तर लोकांच्या विश्वासात आहे. आजची छोटी सुरुवात उद्याच्या मोठ्या लोकचळवळीचे रूप घेऊ शकते. सत्यासाठी उभे राहणारी लेखणी, जनतेच्या प्रश्नांसाठी धावणारे माध्यम आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारी पत्रकारिता—हीच ‘लोकसम्राट न्यूज पोर्टल’ची खरी ओळख आणि चरित्रात्मक वाटचाल आहे. लोकसम्राट “लोकांचा आवाज… लोकांच्या प्रश्नांसाठी… लोकहिताच्या वाटेवर!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

गणेश विसर्जन घाटांच्या दुरवस्थेवर नाराजी; मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य वंतिने पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश दादा चिवटे यांना उमेदवारीला पाठिंबा…

मिरवणुकांच्या आवाजावरून पुन्हा प्रश्नचिन्ह; ‘तुमची घरे अडचणीत, आवाजाचा त्रास आधी मान्यतेय?’

मुख्य हेडलाईन “हातात पदवी, पण नोकरीचा पत्ता नाही! शिक्षण आणि रोजगारातील वाढती दरी तरुणांसाठी धोक्याची घंटा” उपशीर्षक “उद्योगांना हवीत कौशल्ये, विद्यार्थ्यांकडे आहेत पदव्या; रोजगारक्षम शिक्षणाची आता नितांत गरज”….

शिक्षक भरतीतील कागदपत्र पडताळणीला गैरहजर राहिल्यास नोकरी गमावण्याचा इशारा; ३४९ उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जाणार…

सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांच्या बेडवर ढेकूणांचा उपद्रव; रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…

Leave a Comment