होम सोलापूर महाराष्ट्र राजकीय देश - विदेश क्राईम मनोरंजन
---Advertisement---

साने गुरुजी कथामाला आणि वृत्तपत्र लेखक मंचाचा उपक्रम

On: August 22, 2026 1:12 PM
Follow Us:
---Advertisement---

 


—————-
विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत आणि ‘वृत्तपत्र लेखक दिन’ उत्साहात साजरा…
——————
. ​सोलापूर दि. २२ – “आजचे युग जरी विज्ञानाचे असले तरी भारतीय संस्कृती हीच आपली खरी रक्षक आहे. आपल्या संस्कृतीचा अभ्यास करणे ही आजच्या काळाची गरज असून, विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबतच सामाजिक ज्ञानाचे वाचन व लेखन केले पाहिजे. कथामाला आणि वृत्तपत्र लेखक मंचाचे कार्य अत्यंत आदर्श असून इतरांनीही याचा आदर्श घ्यावा,” असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) शाखा जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी केले.

 


. ​अ. भा. साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूर आणि सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींना शैक्षणिक आर्थिक मदत वाटप आणि ‘वृत्तपत्र लेखक दिन’ सोहळा समाज कल्याण केंद्र, सोलापूर येथे मोठ्या थाटात पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पद्माकर कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक निवृत्ती गायकवाड हे होते.


. ​कार्यक्रमाची सुरुवात अरुण धुमाळ यांनी सादर केलेल्या साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाली. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक करताना कथामालेच्या अध्यक्षा आरती काळे यांनी कथामालेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. तर लेखक मंचाचे अध्यक्ष फैय्याज शेख यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना वृत्तपत्र लिखाणाचे महत्त्व सांगून त्यांना व्यक्त होण्याचे आवाहन केले.
. ​या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थिनींना प्रत्येकी एक हजार रुपयांची शैक्षणिक मदत सुपूर्द करण्यात आली. या मदतपात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन प्रा. अशोक म्हमाणे यांनी केले, तर प्रमुख अतिथींचा परिचय कार्याध्यक्ष रामकृष्ण अघोर यांनी करून दिला.


​अध्यक्षीय भाषणात निवृत्ती गायकवाड यांनी अशा सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास कथामाला व लेखक मंचाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन डॉ. रामचंद्र धर्मसाले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्रीवल्लभ करकमकर यांनी मानले. कार्यक्रमास अशोक खानापुरे, सुनील पुजारी,विठ्ठल वठारे, मल्लिनाथ किणगी प्रा. अशोक म्हमाणे,रंगसिद्ध दसाडे.प्रेमचंद मेने, प्रांजली
मोहिकर, अनुराधा निकम इ. सदस्य उपस्थित होते.

Dange

लोकसम्राट न्यूज पोर्टल : जनतेच्या आवाजातून उभे राहिलेले लोकशाहीचे व्यासपीठ ‘लोकसम्राट’ न्यूज पोर्टल हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आणि समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्तेच्या केंद्रापासून सामान्य नागरिकाच्या दारापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारिता करते. याच विचारातून ‘लोकसम्राट’ या न्यूज पोर्टलची वाटचाल आकार घेत आहे. संघर्ष, विचार आणि सत्याची वाटचाल ‘लोकसम्राट’ची ओळख केवळ नावापुरती मर्यादित नाही. या नावामागे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, सत्याचा शोध, अन्यायाविरोधात आवाज आणि लोकहिताची भूमिका हा विचार आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासनातील त्रुटी असोत किंवा ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न असोत—प्रत्येक विषयाकडे लोकांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न ‘लोकसम्राट’ करतो. ‘लोकसम्राट’ नावामागची भूमिका ‘लोकसम्राट’ म्हणजे सत्तेचा सम्राट नव्हे; लोकांच्या विश्वासाचा प्रतिनिधी अशी या नावामागची भूमिका आहे. ज्यांचा आवाज अनेकदा मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचत नाही, त्या सामान्य नागरिकांना व्यासपीठ मिळावे, ही या माध्यमाची भूमिका आहे. त्यामुळे ‘लोकसम्राट’च्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. बातमीपेक्षा जबाबदारी महत्त्वाची आजच्या वेगवान डिजिटल युगात बातमी सर्वप्रथम देण्याची स्पर्धा मोठी आहे. मात्र ‘लोकसम्राट’साठी केवळ वेग महत्त्वाचा नसून बातमीची विश्वासार्हता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. एखाद्या बातमीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असेल, प्रशासनाचे लक्ष एखाद्या समस्येकडे वेधले जात असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीचा आवाज संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचत असेल, तर तीच पत्रकारितेची खरी ताकद आहे. जनतेचा आवाज, जनहिताचा विचार ‘लोकसम्राट’ची वाटचाल ही जनतेशी जोडलेली आहे. लोकांच्या समस्या मांडणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे, चांगल्या कामाची दखल घेणे आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, हा या माध्यमाचा मूलभूत उद्देश आहे. सत्य, विश्वास आणि जनहित या मूल्यांच्या आधारावर पत्रकारितेची नवी ओळख निर्माण करण्याचा ‘लोकसम्राट’चा प्रयत्न आहे. पुढील वाटचालीचे ध्येय भविष्यात डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचणे, स्थानिक प्रश्नांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळवून देणे आणि तरुण पिढीला जबाबदार पत्रकारितेशी जोडणे, हे ‘लोकसम्राट’चे ध्येय आहे. लोकसम्राटची खरी ताकद त्याच्या नावात नाही, तर लोकांच्या विश्वासात आहे. आजची छोटी सुरुवात उद्याच्या मोठ्या लोकचळवळीचे रूप घेऊ शकते. सत्यासाठी उभे राहणारी लेखणी, जनतेच्या प्रश्नांसाठी धावणारे माध्यम आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारी पत्रकारिता—हीच ‘लोकसम्राट न्यूज पोर्टल’ची खरी ओळख आणि चरित्रात्मक वाटचाल आहे. लोकसम्राट “लोकांचा आवाज… लोकांच्या प्रश्नांसाठी… लोकहिताच्या वाटेवर!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

गणेश विसर्जन घाटांच्या दुरवस्थेवर नाराजी; मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य वंतिने पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश दादा चिवटे यांना उमेदवारीला पाठिंबा…

मिरवणुकांच्या आवाजावरून पुन्हा प्रश्नचिन्ह; ‘तुमची घरे अडचणीत, आवाजाचा त्रास आधी मान्यतेय?’

मुख्य हेडलाईन “हातात पदवी, पण नोकरीचा पत्ता नाही! शिक्षण आणि रोजगारातील वाढती दरी तरुणांसाठी धोक्याची घंटा” उपशीर्षक “उद्योगांना हवीत कौशल्ये, विद्यार्थ्यांकडे आहेत पदव्या; रोजगारक्षम शिक्षणाची आता नितांत गरज”….

शिक्षक भरतीतील कागदपत्र पडताळणीला गैरहजर राहिल्यास नोकरी गमावण्याचा इशारा; ३४९ उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जाणार…

सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांच्या बेडवर ढेकूणांचा उपद्रव; रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…

Leave a Comment