होम सोलापूर महाराष्ट्र राजकीय देश - विदेश क्राईम मनोरंजन
---Advertisement---

शिवदारे प्रतिष्ठानतर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर…

On: August 13, 2026 8:36 AM
Follow Us:
---Advertisement---

 

शिवदारे प्रतिष्ठानतर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाही
वैद्यकीय, सामाजिक, कृषी व पत्रकारिता क्षेत्रातील .चार मान्यवरांचा होणार सन्मान; १७ ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा…

 

 

 

 

सोलापूर : श्री. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठान, सोलापूरच्या वतीने सामाजिक, वैद्यकीय, कृषी आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय व दीर्घकाळ कार्य करणाऱ्या चार मान्यवरांना यंदाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक पुरस्कारार्थीस २१ हजार १ रुपयांची रोख रक्कम व. ह  स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.प्रतिष्ठानच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. विरेंद्रकुमार सत्यांकार अवस्थी, सामाजिक क्षेत्रातून मटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, यमगरवाडी, कृषी क्षेत्रातून श्री. दिनकर बळीराम गुंड आणि पत्रकारिता क्षेत्रातून श्री. राहुल कुलकर्णी यांची निवड करण्यात 

चार क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरववैद्यकीय क्षेत्र – डॉ. विरेंद्रकुमार सत्यांकार अवस्थी :डॉ. अवस्थी यांनी सोलापूरमध्ये नेत्रचिकित्सा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. सोलापूर येथील अद्ययावत सोयींनीयुक्त नेत्रालयाच्या माध्यमातून त्यांनी रुग्णसेवा केली. अक्कलकोट परिसरातील गरजू व गरीब रुग्णांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे.

सामाजिक क्षेत्र – भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, यमगरवाडी :तुळजापूर तालुक्यातील नांदुरी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान शिक्षण, स्वावलंबन, सुरक्षा आणि समानतेच्या माध्यमातून विमुक्त भटक्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे. आश्रमशाळा, वसतिगृह, क्रीडा-सांस्कृतिक उपक्रम तसेच मुलींसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. संस्थेच्या माध्यमातून विमुक्त समाजातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.

कृषी क्षेत्र – श्री. दिनकर बळीराम गुंड :
बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथील शेतकरी श्री. दिनकर गुंड यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये विविध प्रयोग केले आहेत. सुमारे ११५ एकर क्षेत्रावर शेती करताना त्यांनी वांगी, ऊस, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, मिरची आदी पिकांचे उत्पादन घेतले आहे. त्यांच्या प्रयोगशील शेतीचा अभ्यास करण्यासाठी कृषी अधिकारी तसेच शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत असल्याचे प्रतिष्ठानने नमूद केले आहे.

पत्रकारिता क्षेत्र – श्री. राहुल कुलकर्णी :
धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार व संपादक म्हणून राहुल कुलकर्णी यांची ओळख आहे. डिजिटल माध्यमातही ते सक्रिय असून राजकीय, सामाजिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवरील वार्तांकन, विशेष मुलाखती आणि सखोल विश्लेषणासाठी ते परिचित आहेत. पत्रकारितेतील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
१७ ऑगस्टला पुरस्कार वितरण
श्री. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर वि. शिवदारे यांच्या पुढाकाराने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता सोलापूर येथील ‘किलॉस्कर सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालय संकुल, पार्क चौक’ येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
कार्यक्रमास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आ. बसवराज पाटील (मुरूमकर) यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ज्येष्ठ पत्रकार रजनीश जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. ‘सोलापूर जिल्ह्याचे जल-नियोजन’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
शिवदारे प्रतिष्ठानची समाजाभिमुख परंपरा
कै. वि. गु. शिवदारे अण्णांनी सार्वजनिक, सामाजिक व राजकीय जीवनात दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम राबविले जात आहेत. १९९९ पासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, सामुदायिक विवाह, शैक्षणिक उपक्रमांसाठी आर्थिक मदत तसेच विविध संस्थांना सहकार्य करण्यात येत असल्याची माहिती पत्रिकेत देण्यात आली आहे.
याच सामाजिक बांधिलकीतून विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ‘जीवन गौरव पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर वि. शिवदारे व विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Dange

लोकसम्राट न्यूज पोर्टल : जनतेच्या आवाजातून उभे राहिलेले लोकशाहीचे व्यासपीठ ‘लोकसम्राट’ न्यूज पोर्टल हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आणि समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्तेच्या केंद्रापासून सामान्य नागरिकाच्या दारापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारिता करते. याच विचारातून ‘लोकसम्राट’ या न्यूज पोर्टलची वाटचाल आकार घेत आहे. संघर्ष, विचार आणि सत्याची वाटचाल ‘लोकसम्राट’ची ओळख केवळ नावापुरती मर्यादित नाही. या नावामागे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, सत्याचा शोध, अन्यायाविरोधात आवाज आणि लोकहिताची भूमिका हा विचार आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासनातील त्रुटी असोत किंवा ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न असोत—प्रत्येक विषयाकडे लोकांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न ‘लोकसम्राट’ करतो. ‘लोकसम्राट’ नावामागची भूमिका ‘लोकसम्राट’ म्हणजे सत्तेचा सम्राट नव्हे; लोकांच्या विश्वासाचा प्रतिनिधी अशी या नावामागची भूमिका आहे. ज्यांचा आवाज अनेकदा मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचत नाही, त्या सामान्य नागरिकांना व्यासपीठ मिळावे, ही या माध्यमाची भूमिका आहे. त्यामुळे ‘लोकसम्राट’च्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. बातमीपेक्षा जबाबदारी महत्त्वाची आजच्या वेगवान डिजिटल युगात बातमी सर्वप्रथम देण्याची स्पर्धा मोठी आहे. मात्र ‘लोकसम्राट’साठी केवळ वेग महत्त्वाचा नसून बातमीची विश्वासार्हता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. एखाद्या बातमीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असेल, प्रशासनाचे लक्ष एखाद्या समस्येकडे वेधले जात असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीचा आवाज संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचत असेल, तर तीच पत्रकारितेची खरी ताकद आहे. जनतेचा आवाज, जनहिताचा विचार ‘लोकसम्राट’ची वाटचाल ही जनतेशी जोडलेली आहे. लोकांच्या समस्या मांडणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे, चांगल्या कामाची दखल घेणे आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, हा या माध्यमाचा मूलभूत उद्देश आहे. सत्य, विश्वास आणि जनहित या मूल्यांच्या आधारावर पत्रकारितेची नवी ओळख निर्माण करण्याचा ‘लोकसम्राट’चा प्रयत्न आहे. पुढील वाटचालीचे ध्येय भविष्यात डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचणे, स्थानिक प्रश्नांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळवून देणे आणि तरुण पिढीला जबाबदार पत्रकारितेशी जोडणे, हे ‘लोकसम्राट’चे ध्येय आहे. लोकसम्राटची खरी ताकद त्याच्या नावात नाही, तर लोकांच्या विश्वासात आहे. आजची छोटी सुरुवात उद्याच्या मोठ्या लोकचळवळीचे रूप घेऊ शकते. सत्यासाठी उभे राहणारी लेखणी, जनतेच्या प्रश्नांसाठी धावणारे माध्यम आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारी पत्रकारिता—हीच ‘लोकसम्राट न्यूज पोर्टल’ची खरी ओळख आणि चरित्रात्मक वाटचाल आहे. लोकसम्राट “लोकांचा आवाज… लोकांच्या प्रश्नांसाठी… लोकहिताच्या वाटेवर!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

गणेश विसर्जन घाटांच्या दुरवस्थेवर नाराजी; मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य वंतिने पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश दादा चिवटे यांना उमेदवारीला पाठिंबा…

मिरवणुकांच्या आवाजावरून पुन्हा प्रश्नचिन्ह; ‘तुमची घरे अडचणीत, आवाजाचा त्रास आधी मान्यतेय?’

मुख्य हेडलाईन “हातात पदवी, पण नोकरीचा पत्ता नाही! शिक्षण आणि रोजगारातील वाढती दरी तरुणांसाठी धोक्याची घंटा” उपशीर्षक “उद्योगांना हवीत कौशल्ये, विद्यार्थ्यांकडे आहेत पदव्या; रोजगारक्षम शिक्षणाची आता नितांत गरज”….

शिक्षक भरतीतील कागदपत्र पडताळणीला गैरहजर राहिल्यास नोकरी गमावण्याचा इशारा; ३४९ उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जाणार…

सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांच्या बेडवर ढेकूणांचा उपद्रव; रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…

Leave a Comment