होम सोलापूर महाराष्ट्र राजकीय देश - विदेश क्राईम मनोरंजन
---Advertisement---

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी विराट महामोर्चाचे शनिवारी पुण्यात आयोजन…

On: August 7, 2026 3:46 PM
Follow Us:
---Advertisement---

­


  1. संविधान व आरक्षण बचावासाठी जुना बाजार चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार शांततामय मोर्चा; समाजातील सर्व घटकांना सहभागी होण्याचे आवाहन…
    लोक सम्राट नेटवर्क | प्रतिनिधी | पुणे
    पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध आंबेडकरी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) विरोधात शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संविधानाने अनुसूचित जाती समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण, सामाजिक न्याय अबाधित ठेवणे आणि आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून, समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११.०० वाजता जुना बाजार चौक, मंगळवार पेठ येथून मोर्चास प्रारंभ होईल. त्यानंतर मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे पोहोचणार आहे. हा मोर्चा पूर्णपणे शांततामय, शिस्तबद्ध आणि संविधानिक मार्गाने काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
मोर्चाद्वारे संविधानातील समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचे संरक्षण करण्याचा संदेश दिला जाणार असून, “संविधान वाचवा, आरक्षण वाचवा – उपवर्गीकरणाला ठाम विरोध करा” हा प्रमुख संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
या महामोर्चात विविध सामाजिक संघटना, आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते, युवक, महिला, विद्यार्थी तसेच समाजातील सर्व घटक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. समाजहितासाठी आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वांनी या मोर्चात उपस्थित राहून एकजूट दाखवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  • मोर्चाची माहिती
    दिनांक : शनिवार, ८ ऑगस्ट २०२६
    वेळ : सकाळी ११:०० वाजता
    मार्ग : जुना बाजार चौक, मंगळवार पेठ → डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा → जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे
    📸 फोटो फीचर  लोक सम्राट न्यूज नेटवर्क

Dange

लोकसम्राट न्यूज पोर्टल : जनतेच्या आवाजातून उभे राहिलेले लोकशाहीचे व्यासपीठ ‘लोकसम्राट’ न्यूज पोर्टल हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आणि समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्तेच्या केंद्रापासून सामान्य नागरिकाच्या दारापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारिता करते. याच विचारातून ‘लोकसम्राट’ या न्यूज पोर्टलची वाटचाल आकार घेत आहे. संघर्ष, विचार आणि सत्याची वाटचाल ‘लोकसम्राट’ची ओळख केवळ नावापुरती मर्यादित नाही. या नावामागे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, सत्याचा शोध, अन्यायाविरोधात आवाज आणि लोकहिताची भूमिका हा विचार आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासनातील त्रुटी असोत किंवा ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न असोत—प्रत्येक विषयाकडे लोकांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न ‘लोकसम्राट’ करतो. ‘लोकसम्राट’ नावामागची भूमिका ‘लोकसम्राट’ म्हणजे सत्तेचा सम्राट नव्हे; लोकांच्या विश्वासाचा प्रतिनिधी अशी या नावामागची भूमिका आहे. ज्यांचा आवाज अनेकदा मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचत नाही, त्या सामान्य नागरिकांना व्यासपीठ मिळावे, ही या माध्यमाची भूमिका आहे. त्यामुळे ‘लोकसम्राट’च्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. बातमीपेक्षा जबाबदारी महत्त्वाची आजच्या वेगवान डिजिटल युगात बातमी सर्वप्रथम देण्याची स्पर्धा मोठी आहे. मात्र ‘लोकसम्राट’साठी केवळ वेग महत्त्वाचा नसून बातमीची विश्वासार्हता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. एखाद्या बातमीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असेल, प्रशासनाचे लक्ष एखाद्या समस्येकडे वेधले जात असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीचा आवाज संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचत असेल, तर तीच पत्रकारितेची खरी ताकद आहे. जनतेचा आवाज, जनहिताचा विचार ‘लोकसम्राट’ची वाटचाल ही जनतेशी जोडलेली आहे. लोकांच्या समस्या मांडणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे, चांगल्या कामाची दखल घेणे आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, हा या माध्यमाचा मूलभूत उद्देश आहे. सत्य, विश्वास आणि जनहित या मूल्यांच्या आधारावर पत्रकारितेची नवी ओळख निर्माण करण्याचा ‘लोकसम्राट’चा प्रयत्न आहे. पुढील वाटचालीचे ध्येय भविष्यात डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचणे, स्थानिक प्रश्नांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळवून देणे आणि तरुण पिढीला जबाबदार पत्रकारितेशी जोडणे, हे ‘लोकसम्राट’चे ध्येय आहे. लोकसम्राटची खरी ताकद त्याच्या नावात नाही, तर लोकांच्या विश्वासात आहे. आजची छोटी सुरुवात उद्याच्या मोठ्या लोकचळवळीचे रूप घेऊ शकते. सत्यासाठी उभे राहणारी लेखणी, जनतेच्या प्रश्नांसाठी धावणारे माध्यम आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारी पत्रकारिता—हीच ‘लोकसम्राट न्यूज पोर्टल’ची खरी ओळख आणि चरित्रात्मक वाटचाल आहे. लोकसम्राट “लोकांचा आवाज… लोकांच्या प्रश्नांसाठी… लोकहिताच्या वाटेवर!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

गणेश विसर्जन घाटांच्या दुरवस्थेवर नाराजी; मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य वंतिने पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश दादा चिवटे यांना उमेदवारीला पाठिंबा…

मिरवणुकांच्या आवाजावरून पुन्हा प्रश्नचिन्ह; ‘तुमची घरे अडचणीत, आवाजाचा त्रास आधी मान्यतेय?’

मुख्य हेडलाईन “हातात पदवी, पण नोकरीचा पत्ता नाही! शिक्षण आणि रोजगारातील वाढती दरी तरुणांसाठी धोक्याची घंटा” उपशीर्षक “उद्योगांना हवीत कौशल्ये, विद्यार्थ्यांकडे आहेत पदव्या; रोजगारक्षम शिक्षणाची आता नितांत गरज”….

शिक्षक भरतीतील कागदपत्र पडताळणीला गैरहजर राहिल्यास नोकरी गमावण्याचा इशारा; ३४९ उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जाणार…

सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांच्या बेडवर ढेकूणांचा उपद्रव; रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…

Leave a Comment